Breaking News Latest updates loading...

२९ एप्रिल ते १२ मे दरम्यान राज्यात हाय अलर्ट

  


पुणे: विदर्भासह महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये २९ एप्रिल ते १२ मे दरम्यान, सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत कोणत्याही व्यक्तीने उन्हात बाहेर जाऊ नये, कारण हवामान विभागाने सांगितले आहे की तापमान ४५ अंश सेल्सिअस ते ५५ अंश सेल्सिअस पर्यंत जाऊ शकते. विशेषतः सकाळी १० ते दुपारी ३ दरम्यान थेट सूर्यप्रकाश टाळावा. ही माहिती इतरांपर्यंत पोहोचवावी कारण अनेकांना ही माहिती पहिल्यांदाच मिळत असेल, असे आवाहन नागरिक संरक्षण महासंचालनालयाने केले आहे.


 जर कोणाला घुसमटल्यासारखे वाटले किंवा अचानक तब्येत बिघडली तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. घरातील दरवाजे उघडे ठेवावेत जेणेकरून वायुवीजन होईल. मोबाईलचा वापर कमी करावा, मोबाईल फुटण्याची शक्यता असू शकते. शक्यतो दही, ताक, बेलफळाचा रस इत्यादी थंड पेयांचा वापर करावा असे आवाहन करण्यात आले आहे.

नागरिक संरक्षण महासंचालनालयाने नागरिकांना आणि रहिवाशांना पुढील बाबींविषयी इशारा दिला आहे. ४७ अंश सेल्सिअस ते ५५ अंश सेल्सिअस दरम्यान वाढणारे तापमान आणि पुढील काही दिवसांत क्युम्युलस ढगांच्या उपस्थितीमुळे बहुतांश भागात उष्ण व दमट वातावरण निर्माण होईल. 

पुरेसे पाणी आणि द्रवपदार्थ प्यावेत. गॅस सिलिंडर उन्हात ठेवू नये. वीजमीटरवर जास्त भार टाकू नये. घरातील वापरात असलेल्या भागातच एसी वापरावा, दोन ते तीन तासांनी ३० मिनिटे विश्रांती घ्या. बाहेर तापमान ४५–४७ अंश सेल्सिअस असताना घरातील एसी २४–२५ अंश सेल्सिअस वर ठेवावा, त्यामुळे आरोग्य चांगले राहील, असे 

विंचू आणि साप यांच्यापासून सावध रहावे, कारण ते त्यांच्या बिळातून बाहेर येऊन थंड जागा शोधण्यासाठी बागेत किंवा घरात येऊ शकतात,अशी सूचना देण्यात आली आहे.