मुंबई: राज्यातील १२ जिल्हा परिषदा व त्या अंतर्गत पंचायत समिती निवडणुकांचे मतदान दोन दिवस पुढे ढकलण्यात आले आहे. आता, मतदान ७ फेब्रुवारीला होणार असून मतमोजणी ९ फेब्रुवारीला होणार आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे राज्यात २८ जानेवारी ते ३० जानेवारी असा तीन दिवसांचा दुखवटा राज्य शासनाने जाहीर केला आहे. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.
