News Portal

शेती महामंडळ मधील कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांसाठी मोर्चा

पुणे: महाराष्ट्र राज्य शेती महामंडळ मधील कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांसाठी व मागण्यांसाठी मोर्चा व धरणे आंदोलन करण्यात आले. मोर्चामध्ये सुमारे ५००० कामगारांचा सहभाग होता.

महाराष्ट्र राज्य लढा कृती समितीचे सरचिटणीस सुभाष कुलकर्णी आणि कामगार कायदे सल्लागार ॲड. संतोष म्हस्के, वंदना पवार यांच्या नेतृत्वाखाली या मोर्चाचे नेतृत्व करण्यात आले होते. या कामगारांना कसेल त्याची जमीन या तत्त्वानुसार निवासाची जागा म्हणून दोन गुंठे देण्यात यावी व त्यांच्या थकीत रकमा तात्काळ अदा करण्यात याव्यात यासाठी हे आंदोलन करण्यात आले.